महाराष्ट्रातून तीन महिन्यात ३ हजार मुली बेपत्ता
- मार्च मध्येच २ हजार पेक्षा जास्त मुली बेपत्ता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील बेपत्ता मुलींची आकडेवारी कोणालाही धक्का बसेल अशीच आहे. राज्यातील 2 हजार 200 मुली मार्चमध्ये बेपत्ता झाल्या असून जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत महाराष्ट्रातून 5 हजार 510 मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात रोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या या आकडेवारीकडे पाहता पुण्यातून 2258 मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यानंतर नाशिकमधून 161, कोल्हापूर 114, ठाणे 133, अहमदनगर 101, जळगाव 81 तर सांगलीतून 82 मुली बेपत्ता झाल्या आहेत.महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात 1600 मुली बेपत्ता झाल्या, फेब्रुवारी महिन्यात 1810 तर एप्रिल महिन्यात 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस ही आकडेवारी वाढणे आपल्यासाठी चिंताजनक आहे. यासाठी फार मोठी यंत्रणा कार्यरत असणं आणि त्या यंत्रणेचा वापर केला जाणं आवश्यक आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने मागील 16 महिन्यांपासून आम्ही सातत्याने पाठपुरवठा करीत आहोत. हरवलेल्या व्यक्तींची मुंबई विभागाकडून आम्ही माहिती घेत असतो. त्यांच्याकडून अहवाल मागवत असतो. प्रत्येक राजकारणाऱ्यांकडे मिसिंग सेल आहे. तो कार्यरत आहे की नाही? मागच्या महिन्यात महिला आयोगाने नागपूरमध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग असा एक प्रोग्रामही घेतला. यामध्ये राज्याचे गृहमंत्रीही उपस्थित होते. सद्यस्थितीतही आव्हानं आणि उपाय योजना यांचा अहवाल आम्ही गृह विभागाला पाठवलाही आहे. मिसिंगमध्ये ज्या तक्रारी समोर येतात त्या मुलींचा शोध लागला नाही. तर या मुलींची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. ही बाब अतिशय चिंताजनक असल्याचंही रूपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.
News - Rajy